ताज्या बातम्यामहाराष्ट्रराजकीय

आरोपी तुमच्या मंत्रिमंडळात, नौटंकी कसली करता? संजय राऊत संतापले

बीडमध्ये राष्ट्रपती शासन लावावं अशी स्थिती...

मुंबई | महाराष्ट्र –
संतोष देशमुख यांची अत्यंत निर्घृणतेने हत्या करण्यात आली. यात वाल्मिक कराडच मुख्य नाव येत असून तो मंत्री धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीय गोटातील असल्याचा दावा करण्यात येतोय. लोकांच्या मनात आक्रोश आहे. बीड आणि परभणीच्या घटनांवरुनही खासदार संजय राऊत यांची राज्य सरकारवर जोरदार टीका. खा. राऊत पुढे म्हणाले “बीडची परिस्थिती अशी आहे की एका जिल्ह्यात राष्ट्रपती शासन लागू करावं. आपल्या घटनेत तशी तरतूद नाही. मी परिस्थिती सांगतो. तिथे सामाजिक राजकीय परिस्थिती गंभीर आहे. तिथे दंगल होईल, लोक रस्त्यावर येतील अशी परिस्थिती आहे”.

बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरुन बीड जिल्ह्यात संतापाची लाट आहे. लोकांच्या मनात आक्रोश आहे. संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूरतेने हत्या करण्यात आली. यात मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराडच मुख्य नाव येत असल्याचा दावा करण्यात येतोय. “मुख्यमंत्र्यांनी बीडला गेलं पाहिजे. ते गृहमंत्री आहेत. त्यांच्या लाडक्या धनुभाऊला घेऊन जावं. संतोष देशमुख यांच्या कुटुंबाचा आक्रोश जर या सरकारला दिसत नसेल तर हे सरकार माणुसकी शुन्य आहे. त्याबद्दल आमच्या मनात कोणतीही शंका नाही” असं खा.संजय राऊत म्हणाले.

बीड मध्ये आणि परभणी मध्ये ज्या घटना घडल्या. त्यावर फडणवीस थातूर मातूर उत्तर देत आहेत. थातूरमातूर हा शब्द योग्य आहे. सरकारचे मंत्री बीडला जात आहे. काय काम आहे तिथे? बीडचा आरोपी तुमच्या मंत्रिमंडळात. तुमच्या खात्यात. परभणीचा आरोपी अजूनही पोलीस खात्यात. ज्याने कस्टडीत सोमनाथ सूर्यवंशीला मारलं. ते पोलीस खात तुम्हाला सलाम करत आहेत. आणि मंत्री जाऊन बीडमध्ये नौटंकी करत आहात हे तुम्हाला शोभतं का?” असा प्रश्न संजय राऊत सत्ताधार्‍यांना यांनी विचारत जोरदार टीका केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button